Festival Posters

मराठा समाजाकडून १७ सप्टेंबरला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव

Webdunia
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (08:10 IST)
मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकारने योग्य ती बाजू न्यायालयात मांडावी यासाठी, मराठा समाज १७ सप्टेंबर रोजी, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. 
 
यावेळी राजेंद्र कोंढरे म्हणाले की,  समाजातील तरुणवर्ग चिंतेत पडला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. मात्र त्या दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा न करता गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
 
ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा स्थगिती आदेश येण्यापूर्वी जी प्रवेश आणि नियुक्त्यांबाबत निवड जाहीर झालेली आहे. त्या सर्व संरक्षित करण्यात याव्यात. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे, ते शासनाने होऊ देऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश जाहीर झाल्यावर, तो आदेश न्यायालयाच्या वेबसाईटवर आला नसताना. शिक्षण विभागाने मराठा समाजाच्या प्रवेशावर तातडीने स्थगिती देऊन चुकीचे केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
आता या आरक्षणाच्या स्थगितीबाबत मराठा समाज गुरुवारी पुणे जिल्हाधिकारी यांना घेराव घालून निषेध करणार आहे. या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा देखील त्यांनी राज्य सरकारला दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

अनोखी परंपरा: नवरदेवाला आईचे दूध पाजण्याची विधी, ही कोणती पद्धत आहे ? व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत

पलाशशी ब्रेकअपनंतर स्मृती मानधनाने घेतली बॅट, श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू

टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून दोन प्रमुख खेळाडूंना वगळले

अहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत, शेतकऱ्यावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता हिंगे यांचे रस्ते अपघातात दुर्देवी निधन

पुढील लेख
Show comments