Marathi Biodata Maker

आरक्षणाचा निर्णय घाईघाईने नको

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (14:52 IST)
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट असून त्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. आरक्षणाचा निर्णय घाईघाईने करता येणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
 
आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकला पाहिजे. राणे स‍मितीच्या अहवालानंतर आघाडी सरकारने मराठा आरक्षण दिले, पण ते कोर्टात टिकले नाही, असेही ते म्हणाले.
 
मराठा आरक्षणाचे आंदोलन राजकीय हेतूने सुरु नाही, मराठा समाजामध्येही गरीब वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला हवे, असे स्पष्टीकरण देसाई यांनी दिले आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संताप
आषाढी वारीत साप सोडण्याचा काहीजणांचा कट होता, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने आंदोलकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. सापाबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांची आहे, मला त्याची माहिती नाही, असे म्हणत देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला आपले समर्थन नसल्याचे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 100 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली, 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार

लातूरमध्ये तरुणाची पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या

LIVE: अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली

शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

पुढील लेख
Show comments