सध्या स्थितीत मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय मराठा मोर्चा संयोजकांनी घेतला आहे.तर हिवाळा अधिवेशन असलेल्या काळात 14 डिसेंबरला नागपुरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक विचार केला नाही तर मुंबईत मोर्चा काढण्यात येईल अशी भूमिका सध्या घेतली असून , अशी माहिती मराठा मोर्चा संयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
मोर्चा संयोजकांच्या बैठकीचं आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी 32 जिल्ह्यातील 11 प्रतिनिधी आले होते. बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांविषयी एकूण 11 निर्णय घेण्यात आले आहेत. तर हा मोर्चा मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांच्या घरी सुद्धा जाणार आहे असेही समोर आले आहे.