Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळी मिरीचे टोटके

Webdunia
ज्योतिष्याप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळी मिरी आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते. याचे काही प्रयोग केल्याने संकटातून मुक्ती मिळेल. धन, वैभवाची प्राप्ती होईल. पाहू याचे काही सोपे टोटके:
घरातून बाहेर पडताना: आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी प्रमुख दारावर काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून पुढला पाऊल टाका. ज्या कामासाठी जात असाल त्यात यश मिळेल.
 
पण एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घेयची विसरला असला तरी पुन्हा घरात प्रवेश करू नका. असे केल्याने परिणामावर प्रभाव पडू शकतो.
  
पुढील पानावर दुसरा उपाय...

श्रीमंत होण्यासाठी: श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर मिर्‍यांचे 5 दाणे आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून घ्या. नंतर एखाद्या एकांत चौरस्त्यावर किंवा एकांत जागेवर उभे राहून 4 दाणे चारी दिशांकडे फेकून द्या. नंतर पाचवा दाणा वरती आकाशाकडे फेका. तेथून परत येताना मागे वळून बघू नका. या उपायाने अचानक धन प्राप्तीचे योग बनतात.
 
पुढील पानावर तिसरा उपाय...

शनीची पीडा दूर करण्यासाठी: काळ्या कापडात काली मिरी आणि पैसे बांधून दान करावे. या उपायाने शनीच्या अडीचकी अर्थात ढैयात येत असलेल्या समस्या दूर होतील.
 
पुढील पानावर चौथा उपाय...

शत्रू नाशक: दिवाळीच्या दिवशी काळी मिरीचे दाणे ‘ऊं क्लीं’ बीज मंत्राचा जप करत कुटुंबाच्या सदस्यांवर ओवाळून घरातून बाहेर दक्षिण दिशेकडे फेकून द्या, शत्रू शांत होतील.
 
पुढील पानावर पाचवा उपाय...

काळी मिरी आहारात सामील करा: आपल्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास, शनीची साडेसाती किंवा ढैया असल्यास, शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करा. जेवणात काळं मीठ आणि मिरपूडचा अधिक वापर करा. अन्नात वरून तिखट, मीठ घेणे टाळा. हिरव्या मिरच्यांचेही अधिक सेवन टाळा. या उपायाने रोग आणि दुःख दूर होतील.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments