Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न

Webdunia
छत्तीसगड येथील कोरबा- बाल्को मार्गावर स्थित बेलगिरीमध्ये संथाल आदिवासी लोकांची एक वस्ती आहे, जिथे मकर संक्रांतीच्या दिवशी एक विचित्र परंपरेचा निर्वाह होतो. येथे आपल्या मुलांना मृत्यूदोषापासून दूर करण्यासाठी त्यांचे कुत्र्याशी विवाह केले जाते.
 
येथे मुलांच्या वरील बाजूपासून दात यायला सुरुवात झाली तर पालकांना मृत्यूदोषाची काळजी वाटायला लागते. या दोषापासून मुक्त होण्यासाठी कुत्र्याशी लग्न लावण्यात येतं. शिशू रोग तज्ज्ञांप्रमाणे वरील बाजूला आधी दात येणे ही साधारण प्रक्रिया असून आदिवास्यांमध्ये याबाबद केवळ अंधश्रद्धा आहे.
 
येथे पाच वर्षापर्यंतच्या मुलांची लग्न करवण्यात येतात. दोष मुलामध्ये असल्यास कुत्री तर मुलीमध्ये असल्यास तिचा विवाह कुत्र्यासोबत लावण्यात येतं. हे लग्न अगदी धूमधडाक्याने करण्यात येत असून पालकांचे म्हणणे आहे की याने त्यांच्यावरील संकट दूर होतं.
 
लग्नानंतर समाजातील लोकांना मेजवानी देण्यात येते. संक्रांतीच्या जवळपास लग्न लावणे शक्य नसल्यास होळीच्या दुसर्‍या दिवशी ही परंपरा निभावली जाते.
 
ही परंपरा पाळणारे संथाल आदिवासी कोरबाच्या बाल्को क्षेत्रात लालघाट, बेलगिरी वस्ती, शिवनगर, प्रगतीनगर लेबर कॉलोनी आणि दीपिकाजवळ कृष्णानगर क्षेत्रात निवास करतात.
 

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments