Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक गाव भूतांचे...

Webdunia
ज्‍यांच्‍यावर भूत, प्रेताची सावली आहे. किंवा भूताने झपाटलेल्‍या अनेक लोकांबद्दल आम्‍ही आतापर्यंत तुम्‍हाला सांगितलं असेल. मात्र आज आम्‍ही तुम्हाला अशा एका गावात नेणार आहोत. जिथे एक-दोन नव्‍हे संपूर्ण गावालाच भूतानं पछाडलेलं आहे.

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्‍ह्याच्‍या गायबैड़ा नावाच्‍या गावातील पाच ग्रामस्‍थांना अचानक एका अज्ञात आजाराची लागण झाली आणि त्‍यात त्‍यांचा मृत्‍यू झाला. जेव्‍हा ग्रामस्‍थांना या आजाराचे कारण समजू शकले नाही. तेव्‍हा त्‍यांनी जवळच्‍या एका मांत्रिकाची मदत घेण्‍याचं ठरविलं. मांत्रिकाने सांगितलं, की गावावर एका भूताची वक्रदृष्‍टी आहे आणि त्‍यामुळेच लोक मरताहेत. मग ग्रामस्‍थांच्‍या आग्रहावर मांत्रिकाने भूत पळविण्‍यची योजना बनविली.

WD
मांत्रिकाच्‍या सांगण्‍यावरून अशी घोषणा केली गेली की गावाबाहेरून आलेल्‍या लोकांनी त्‍वरित गाव सोडून निघून जावे. आणि केवळ गावातील लोकांनीच गावात राहून भूत पळविण्‍यासाठी होणा-या पूजा-पाठ आणि यज्ञ कार्यात सहभागी व्‍हावे. या आदेशानुसार सर्व धार्मिक विधी पूर्ण केले गेले.

दरम्‍यान भूताला पळवून लावण्‍याचा दावा करणारा मांत्रिकाने भूत पळविण्‍यासाठीचे प्रयत्‍न सुरूच ठेवले. शेवटी संपूर्ण गावाच्‍या सीमेवर दूध टाकून सीमांकित केले गेले. यानंतर आता गावात भूत नसल्‍याचे मांत्रीकाने पटवून दिले.

WD
माणसाच्‍या आकलन शक्‍तीच्‍या पलीकडे गेलेल्‍या गोष्‍टीला तो चमत्‍कार, देव-देवता किंवा मग भूत-बाधा अशा संकल्‍पनांमध्‍ये बांधून ठेवत असल्‍याचे नेहमीच घडते. त्‍याच्‍या याच अज्ञानतेचा फायदा काही लोक उचलतात. आणि लोकांच्‍या भावनांना हात घालून त्‍यांची पिळवणूक करीत असतात. पदोपदी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करणा-या आजच्‍या या शिक्षित व्‍यवस्‍थेत भूताच्‍या गोष्‍टीवर विश्‍वास ठेवून मुर्ख बनणे कितपत योग्‍य वाटते? तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्‍हाला नक्‍की कळवा.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments