Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील पेट्रोलपंप 26 ऑगस्टपासून बेमुदत बंद

Webdunia
शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (11:31 IST)
एलबीटी दर कमी केल्यास आणि एसएससी निर्णय होईपर्यंत व्हॅटचा दर कमी केल्यास राज्यातील पेट्रोल दर पाच ते सहा रुपयांनी कमी होतील. मात्र याबाबत राज्य सरकारशी वारंवार बोलणी करूनही सरकारने दाद न दिल्यामुळे राज्यातील पेट्रोलपंप डिलर्स 26 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
 
गेले सहा महिने सरकारच्या ही बाब निदर्शनास आणूनही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकाच्या हितासाठीच हा बंदचा निर्णय घेण्यात येत असल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोद यांनी सांगितले.
 
राज्यातील जनतेसाठी पाच ते सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त व्हावे म्हणून पेट्रोलपंप मालक प्रयत्न करीत असतानाही सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 11 ऑगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतरही सरकारने या संघटनेला चर्चेला बोलावले नाही. राज्यात महागाईचा भडका उडाला असताना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करून सामान्य जनतेला दिलासा देण्याची संधी हे सरकार का गमावते आहे, असा सवाल करीत संघटनेने हे संपाचे हत्यार उपसले आहे. 
 

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments