Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?

10 rupees coins
Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (11:26 IST)
चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. आता या निर्णयापाठोपाठ मोदी सरकार आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून नोटाबंदीनंतर नाणेबंदी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचे उत्पादन केले जाते. मात्र या चारही टांकसाळमध्ये मंगळवारपासून नाण्यांचे उत्पादन करणे बंद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. त्यामुळे आरबीआयच्या स्टोअरमध्ये नाण्यांचा भरमसाठ अतिरिक्त साठा झाला आहे. त्यामुळेच आरबीआयने पुढील आदेश मिळेपर्यंत नाणी पाडण्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने 500 आणि हजाराच्या नोटा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले होते. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितले होते. या नोटा बंद केल्यानंतर सरकारनेनव्या 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता नाणेबंदी केली जात असल्याचे मानले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनाऱ्यावर सुरक्षा वाढवण्यात आली

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरला पोहोचून पर्यटकांची भेट घेतली

पीडितांचे दुःख पाहून मन दुखावले...पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले

पहलगाममध्ये अडकलेले ८३ पर्यटक आज इंडिगो विमानाने महाराष्ट्रात परतणार, सरकारने यादी जाहीर केली

गडचिरोली : आंघोळीसाठी गेलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यु

पुढील लेख
Show comments