Festival Posters

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी,अधिकारी ३० मे ला संपावर

Webdunia
शुक्रवार, 25 मे 2018 (09:00 IST)
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी ३० मे रोजी संप पुकारला आहे. भारतीय बँक संघाने कर्मचाऱ्यांचा पगार केवळ २ टक्के वाढवला, याविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. पगार वाढीसाठी ५ मे २०१८ रोजी बैठक झाली, बैठकीत बँक संघाने २ टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल ३ च्या अधिकाऱ्यांपर्यंत ही वाढ मर्यादीत असेल. 
 
बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप ३० मे रोजी सकाळी ६ पासून सुरू होईल. १ जून सकाळी ६ पर्यंत हा संप असेल.  
 
युनायटेड फोरम आणि बँक युनियन्सचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटलंय की, एनपीएमुळे बँकांचं जे नुकसान झालं आहे, त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. बँक कर्मचाऱ्यांना मागील २ ते ३ वर्षापासून जनधन योजना, नोटबंदी, मुद्रा आणि अटल पेन्शन योजना या केंद्राच्या प्रमुख योजनांमुळे रात्रंदिवस काम करावं लागलं. या योजनांच्या कामाचा बोझा निश्चितच बँक कर्मचाऱ्यांवर पडला आहे, असं तुळजापूरकर यांनी म्हटलं आहे.बँक कर्मचाऱ्यांना मागील पगार वाढीत १५ टक्के वाढ करण्यात आली होती, ही पगार समिक्षा १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ ऑक्टोबर २०१७ साठी होती. यूएफबी ९ श्रमिक संघटनेची कार्यकारिणी आहे. यात ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज असोसिएशन, तसेच नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स सामिल आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अर्थसंकल्प वाचवण्यासाठी बुलेट ट्रेन आणि द्रुतगती मार्गांचे प्रकल्प थांबवण्याची रोहित पवार यांची मागणी

LIVE: सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

१९ वर्षीय नवविवाहितेच्या आर्त विनवणीकडे दुर्लक्ष झाले; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला, नागपूर मधील घटना

भंडारा : साकोली तहसील परिसरात आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या निमित्ताने भाजपची भव्य योजना, ५ ते २१ जून दरम्यान देशव्यापी संपर्क मोहीम

पुढील लेख
Show comments