Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढील आठवड्यात चार दिवस बंद राहतील बँका, लवकर आटपून घ्या आपली कामे

Webdunia
मंगळवार, 17 मार्च 2020 (16:19 IST)
27 मार्च रोजी बँकिंग सेक्टरच्या दोन मोठ्या युनियन, ऑल इंडिया बँक इम्प्लॉइज एसोसिएशन (AIBEA) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स एसोसिएशन (AIBOA) ने संप पुकारला आहे. 
 
पुढील आठवड्यात बँक संप आणि बँकेच्या इतर ।सुट्ट्यांमुळे बँकिंग शाखा केवळ तीन दिवसांसाठी सुरू राहतील. बँक मर्जर विरुद्ध संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच केंद्र सरकाराने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांना मिळवून चार करण्याच्या निर्णयावर अंतिम शिक्का लगावला होता. हा निर्णय पुढील एक एप्रिलपासून लागू होणार. 
 
पुढील आठवड्यात या दिवसांवर बँका बंद राहतील- 
सोमवार आणि मंगळवारी बँका सुरू राहतील.
बुधवार म्हणजे 25 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगू नव वर्ष आणि उगादि सण असल्याने बेलापुर, बंगलूरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, मुंबई, नागपूर, श्रीनगर आणि पणजी मध्ये बँका बंद राहतील.
दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी पुन्हा बँक सुरू राहील.
शुक्रवारी म्हणजे 27 मार्च 2020 रोजी बँकेच्या संपामुळे बँकिंग सेवा प्रभावित राहील.
28 मार्च 2020 रोजी महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 मार्च रोजी रविवार आहे. म्हणून या दिवशी देशाच्या सर्व राज्यातील बँकांची सुट्टी राहील.
 
उल्लेखनीय आहे की मागील वर्षी ऑगस्टमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे चार बँकांमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला होता. युनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचा विलय पंजाब नॅशनल बँकेत होणार आहे. या व्यतिरिक्त सिंडिकेट बँकेचं केनरा बँक आणि अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेंसह विलय होणार आहे. या प्रकारेच आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँक ऑफ इंडिया सह विलय होणार.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments