Marathi Biodata Maker

BSNLच्या युजर्ससाठी खूशखबर, 'ही' सेवा 22 दिवसांसाठी असणार विनामूल्य!

Webdunia
गुरूवार, 11 जून 2020 (14:54 IST)
आपल्या 99 रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरला रिवाईज केले आहे. आता या व्हाउचरमध्ये 22 दिवस विनामूल्य पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन (पीआरबीटी) सेवा दिली जात आहे.सामान्यता या सेवेसाठी बीएसएनएल कंपनी दरमहा 30 रुपये घेते आणि युजर्संसाठी प्रत्येक गाण्याच्या निवडीसाठी 12 रुपये द्यावे लागतात. सध्या 99 रुपयांच्या या प्लॅनमध्ये विनामूल्य पीआरबीटीसह इतरही फायदे उपलब्ध आहेत.

बीएसएनएलचे हे खास टॅरिफ व्हाउचर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येते. 22 दिवसांपर्यंत दररोज कॉल करण्यासाठी 250 एफयूपी मिनिटे मिळतात. मर्यादा संपल्यानंतर बेस टॅरिफ कॉल करण्यासाठी शुल्क आकारले जाते.बीएसएनएलचा हा प्लॅन आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, चेन्नई, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये उपलब्ध आहे.

याशिवाय, कर्नाटक, कोलकाता, लडाख, मध्य प्रदेश आणि देशातील इतर अनेक सर्कलच्या बीएसएनएलच्या ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.बीएसएनएलच्या 99 रुपयांच्या एसटीव्हीमध्ये मिळणाऱ्या या बेनिफिट्समध्ये काही सर्कल कमी केले आहेत. ईशान्येकडील काही राज्यांमध्ये या योजनेची वैधता 22 दिवसांवरून 21 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
दरम्याान, या युजर्सना पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन विनामूल्य देण्यात येत आहे. त्याचबरोबर, आसामच्या वापरकर्त्यांना या योजनेत विनामूल्य पीआरबीटीचा लाभ मिळत नाही.केरळ आणि लक्षद्वीपमध्ये ही एसटीव्ही 20 दिवसांच्या वैधतेसह येते. येथे कंपनी युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि विनामूल्य पीआरबीटी देत ​​आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments