Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागरिकांनो तुम्हीच सांगा कसे कांद्याचे भाव कमी करायचे ते

Webdunia
गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:38 IST)
आता अवकाळी पाऊस झाला त्यामुळे साठवलेला कांदा खराब झाला आहे. त्यातच नवीन कांदा यायला अनेक महिने आहेत, त्यामुळे बाजारातील मागणी आणि होणारा पुरवठयामुळे आता तर कांद्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे राज्य काय केंद्र सरकारने सुद्धा प्रयत्न सुरु केले की भाव कमी कसे होतील. पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देशातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव भडकले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव शंभरीच्या पुढे गेले आहेत. कांद्याच्या वाढत्या भावांनी केंद्र सरकारच्या चिंतेतही वाढ झाली असून,  आयात केलेला कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे दर कमी होतील, तसेच कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडिया किंवा कंझ्युमर अॅपच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे. 
 
कांद्याच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सचिवांसोबत महत्वाची बैठक घेतली होती.   कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याबाबत पासवान यांनी सर्वसामान्यांकडूनही सल्ला मागवला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments