Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व इलेक्‍ट्रिक वाहने 2050 पर्यंत शक्‍य

Webdunia
शुक्रवार, 25 मे 2018 (16:55 IST)
भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्‍ट्रिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. मात्र ते 2050 पर्यंत शक्‍य होणार आहे. सरकारने हायब्रीड वाहनाचा पर्याय शिल्ल्क ठेवण्याची गरज असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने म्हटले आहे.
 
कार कंपन्यांना इलेक्‍ट्रिक वाहनाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याबरोबर यासाठी वीज निर्मिती आणि चार्जिंग पॉंईटसारखे काम सरकारला करावे लागणार आहे. त्यासाठीही मोठा कालावधी लागणार असल्याने कंपनीचे उपाध्यक्ष शेखर विश्‍वनाथन यांनी सांगितले. त्याबरोबर आगामी काळात इतर तंत्रज्ञानावर आधारित वाहने विकसित होण्याची शक्‍यता आहे. त्या शक्‍यताही खुल्या ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सरकारने जर हायब्रीड कराचा पर्याय खुला ठेवला तर तुलनेने परिस्थिती चांगली राहण्याची शक्‍यता आहे. त्या अवस्थेत सरकारला पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले की, कंपनीच्या वाहनांना मागणी चांगली आहे. या वर्षी आम्ही 1 लाख 60 हजार वाहनांच्या विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments