Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाल मिरच्यांची विक्रमी आवक दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:56 IST)
नंदुरबार : देशातील दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणा-या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक होत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचा अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे.
 
आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद होता. मात्र सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मिरचीची खरेदी पुन्हा सुरू झाली असली तरी जादा आवक झाल्याने मिरचीचे दर चांगलेच घसरले आहेत. सध्या मिरचीला दोन हजारपासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
 
देशातील सर्वांत मोठी दुस-या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबारला ओळखले जाते. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदुरबार कृषि उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिना मिरच्यांची आवक सुरूच राहणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसूल होत नसल्याने शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याला दिलासा, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला

NEET परीक्षेवर गुरुवारी पुढील सुनावणी, पहिल्यांदा पेपर कधी फुटला एनटीएला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

पुण्यातील दापोडीत ऑन ड्युटी असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना उडवणारा आरोपीला अटक

नवी मुंबईत महिला प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लोको पायलटने लोकल ट्रेन मागे वळवली

सर्व पहा

नवीन

मोदींच्या रशिया दौऱ्याकडे जग कसं पाहतं? मोदी-पुतिन भेटीत नेमकं काय होणार?

मुंबईत मुसळधार, राज्यात 'या' ठिकाणी आज रेड अलर्ट; तर 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : जुलैच्या सुरवातीस चांगला पाऊस, मागील वर्षापेक्षा चांगल्या होतील पेरण्या

गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

Deadly Accident: भीषण अपघात, स्कॉर्पियोच्या धडकेत पति-पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments