rashifal-2026

येवल्यात कांद्याचे प्रचंड नुकसान; शेतकऱ्याला अश्रू अनावर!

Webdunia
बुधवार, 12 एप्रिल 2023 (07:21 IST)
नाशिक (प्रतिनिधी): येवला तालुक्यात  वादळीवाऱ्यासह झालेल्या गारांच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
विशेषता काढणीला आलेला तसेच काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरवला आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात आसू आले आहेत.
 
दिवसभर वातावरणात उष्णता होती, मात्र रात्री नऊच्या सुमारास जोरदार वादळ आले. वादळाची तीव्रता इतकी होती, की शहरातील क्रीडा संकुल येथे मोठे झाड उन्हाळून पडले. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय अनेकांनी झाकलेल्या कांद्याच्या पोळीवरील कागदही उडून गेले.
 
सध्या उन्हाळ कांद्याची काढणी वेगात सुरू असून शेतकऱ्यांनी पोळी घालून ठेवलेल्या आहेत. अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरलेला नाही. या पावसामुळे असा उघड्यावर असलेला कांदा ओला झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.
 
काही शेतकऱ्यांनी शेतातच कांदा काढून ठेवलेला होता, हा कांदा देखील ओला होऊन खराब झाल्याने आता साठवण्याच्या दर्जाचा राहिला नाही. परिणामी मिळेल त्या भावात हा कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
 
ग्रामीण भागातील वीजपुरवठा थंडीत झालाच परंतु शहरात देखील सुमारे तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित असल्याने रात्री उशिरापर्यंत सुरळीत पुरवठ्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागली. या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यात शाळकरी मुलासोबत शिक्षकाने केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

LIVE: महायुती सरकारने २२ वर्षांचा रोडमॅप निश्चित केला

ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर बंदी; 16 वर्षांखालील मुले फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरू शकणार नाहीत

भारताने दक्षिण आफ्रिकेला 74 धावांत गुंडाळून 101 धावांनी मोठा विजय मिळवला

आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान कारवर आदळले

पुढील लेख
Show comments