Festival Posters

मागील हिशोब न देता कारखाने चालू ठेवले तर संघर्ष अटळ- राजू शेट्टी

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (21:53 IST)
आम्ही जे मागतोय ते हिशोबाने मागतोय… मागील हिशोब पुरा न ठेवता कारखानदार कारखाना चालु ठेवणार असतील तर संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. या बैठकीला कारखानदारांनी उशीर केल्याने साखर कारखाने वेळेत सुरु होत नाहीत. त्यामुळे हिशेब पुर्ण करा आणि कारखाने चालु करा असे आवाहनही राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
 
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु झाला आहे. पण ऊस दराच्या तोडग्याअभावी अपवाद वगळता सर्व कारखाने बंदच आहेत. साखरेसह अन्य उपपदार्थांना गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाल्यामुळे गत वर्षात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयेंचा हप्ता आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची सर्वच शेतकरी संघटनांची मागणी आहे. पण कारखानदारांना ही मागणी मान्य नसल्यामुळे संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठक आयोजित केली आहे.
 
या बैठकिनंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “आमची मागणी रास्त आहे. आम्ही 400 रूपये हिशोबाने मागतोय. बी हेवी मॉलेसिसपासून इथेनॉल तयार होते असल्याने साखर कारखान्यांची रिकव्हरी कमी होते. त्याचा फटका उस उत्पादकांचा होऊन तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून निघले पाहीजे.” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
 
पुढे कारखानदारांवर आरोप करताना ते म्हणाले, “या बैठकीला साखर कारखानदारांनी उशीर केला आहे. त्यामुळे वेऴेत कारखाने सुरु होत नाहीत ही जबाबदारी त्यांची आहे. हिशेब पुर्ण करा आणि कारखाने चालु करा अशीच आमची मागणी आहे. मागिल हिशोब पुर्ण न करता कारखानदार कारखाना चालु ठेवणार असतील तर मात्र संघर्ष अटळ आहे.” असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments