Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्याजदर ‘जैसे थे'; कर्जदारांना दिलासा

Webdunia
गुरूवार, 8 एप्रिल 2021 (08:15 IST)
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झालेली वाढ आर्थिक विकासाच्या वाढीत अडथळा ठरेल. नव्याने घातलेले निर्बंध विकासाला मारक ठरतील, अशी भीती व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे'च ठेवले आहेत. महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता शक्यता होती मात्र तूर्त व्याजदर ‘जैसे थे'च ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
 
बुधवारी आरबीआय गव्हर्नर दास यांनी पतधोरण जाहीर केले. यात बँकेने रेपोदर 4 टक्क्यांवर ‘जैसे थे' ठेवला आहे. तर रोख राखीव प्रमाणामध्ये कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) 3.35 टक्के ठेवला आहे. यामुळे कर्जदर वाढण्याची शक्यता कमी असून कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
 
यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पतधोरण आढावत बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. फेब्रुवारीत महागाई दर 5 टक्क्यांवर गेला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्षपेक्षा अधिक आहे. अन्नधान्यांच्या किमती नजीकच्या काळात पुरवठा आणि मॉन्सूनच्या कामगिरीवर अवलंबून असतील, असे दास यांनी सांगितले. 2020-21 या वर्षात भारताचा विकासदर 10. 5 टक्के राहील असा अंदाज दास यांनी व्यक्त केला.
 
मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारच्या 24 तासांत 96 हजार 982 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. याच दिवशी तब्बल बरे झालेल्या 50 हजार 143 जणांना रुग्णालातून सोडण्यात आले तर 446 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. याबाबत बँकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली. नव्याने लागू होणारे निर्बंध विकासाला बाधक ठरतील, असे दास यांनी सांगितले. महागाई वाढीवर देखील आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. 2021 च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर 5 टक्के राहील तर 2021-22 च्या पहिाल्या समाहित विकास दर 4.4 टक्के राहील तर तिसर्या तिमाहीत तो 5.1 टक्के राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. विकासाला चालना देण्याच्या उपायोजना बँकेकडून केल्या जातील आणि तसे पतधोरण असेल, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले. 

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments