Festival Posters

येथे लिंबू 400 रुपये किलो, संपूर्ण देशात किमती गगनाला

Webdunia
शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (11:28 IST)
उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असताना लिंबाच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लिंबाचा भाव 300 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. अनेक ठिकाणी एकच लिंबू 10 रुपयांना मिळत असल्याची परिस्थिती आहे. दिल्लीच्या बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नोएडामध्ये लिंबू 240 ते 280 रुपये प्रतिकिलोपर्यंत वेगवेगळ्या किमतीत विकले जात आहे. मंडईतच लिंबाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे काही दुकानदारांचे म्हणणे आहे, गेल्या आठवड्यात 200 रुपये किलोने विकला जाणारा लिंबू आता 250 रुपये किलोच्या पुढे गेला आहे.

दिल्लीच्या आयएनए मार्केटमध्ये लिंबाचा भाव 350 रुपये किलो आहे, तर नोएडाच्या बाजारात 80 रुपये किमतीचा अडीचशे ग्रॅम लिंबू विकला जात आहे. गाझीपूरच्या भाजी मार्केटमध्ये दुकानदारांना किलोमागे 230 रुपये दिले जात आहेत, त्यानंतर बाजारात ग्राहकांना 280 रुपये किलो भाव मिळत आहे. मात्र, बाजारात दोन प्रकारचे लिंबूही विकले जात आहेत, पहिला हिरवा लिंबू 280 रुपये आणि दुसरा पिवळा लिंबू 360 रुपये किलो दराने विकला जात आहे.
 
राजस्थानमध्ये लिंबूचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बाजारात 400 रुपये किलो दराने लिंबू विकले जात आहेत. दुकानांमध्ये एक ग्लास लिंबूपाणी 20 रुपयांना विकली जात आहे. गेल्या आठवड्यापर्यंत लिंबाचा भाव किलोमागे 350 रुपये होता.
 
याचे सर्वात मोठे कारण डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किमती असल्याचे मानले जात आहे. वाहतूक खर्चात वाढ आणि मंडईतील आवक घटल्याने लिंबाच्या दरात वाढ होत आहे.
 
लिंबू व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. लिंबू शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी ठेवते. व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबाचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप

अजित पवारांची स्वप्ने पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी, सुनील तटकरे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली

मंत्री नरहरी झिरवाल यांचा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न! मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; तृतीयपंथी व्यक्तीच्या भावावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments