Marathi Biodata Maker

मुंबईत दूधबंदी आंदोलनाचा परिणाम नाही

Webdunia
मंगळवार, 17 जुलै 2018 (08:58 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध असल्याने सुरळीतपणे विक्री सुरू होती. सध्या गरजेहून अधिक दूध उपलब्ध आहे, मात्र हे आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास दूधटंचाई उद्भवू शकते, अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
 
मुंबईला होणारा दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर गोकुळ, वारणा याबरोबरच बहुतांश दूध उत्पादक कंपन्यांनी शनिवार, रविवारी अतिरिक्त दूध संकलन करून ठेवले आहे. त्याशिवाय गुजरातहून येणारे अमूलचे दूध  रेल्वेतून पाठविण्यात आले. मुंबईकरांना गरज ७० लाख लीटरची असून  पुरवठा
एक कोटी १२ लाख लीटर दुध उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास दुप्पट दुधाचा पुरवठा असल्याने मंगळवारीही विक्रीवर फारसा परिणाम जाणवणार नाही, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर

15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

सोमनाथ स्वाभिमान पर्व : 1000 वर्षांपूर्वी, आक्रमणकर्त्यांना वाटले की ते जिंकले आहेत, आपल्या पूर्वजांनी महादेवासाठी सर्वस्व अर्पण केले, असे सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान मोदी म्हणाले

19 वर्षाच्या तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार

ओडिशामध्ये चार्टर्ड विमान कोसळले, 2 वैमानिकांसह 6जण जखमी

पुढील लेख
Show comments