suvichar

रामदेवबाबांनी काढला भाजपचा चिमटा

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:52 IST)
रुपयाच्या घसरणीमुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले.
 
राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकासदर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल? रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
 
देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेकजण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला. नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकामुंळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

वाढत्या इंधन दरांमुळे इंडिगो आणि एअर इंडियाने जून-जुलै महिन्यासाठीच्या देशांतर्गत विमानसेवा कमी केल्या

14 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, 3 मृत्यू

LIVE: सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याचे प्रसिद्ध सरसबाग आणि गणपती मंदिर दोन दिवस बंद

'महायुती'तील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; पंतप्रधान मोदींची घेतली भेट, जाणून घ्या काय झाली चर्चा

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा शोकांतिक शेवट; प्रियकराच्या आत्महत्येनंतर महिलेनेही संपवले जीवन

पुढील लेख
Show comments