Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क ठप्प होण्यामागचे कारण

Webdunia
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:15 IST)
वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क ठप्प होण्यामागे वेगळंच कारण समोर आलं आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वोडाफोन-आयडियाच्या नेटवर्कला मोठा झटका बसलाय. कल्याणीनगर येथील मुख्य कार्यालयात पाणी शिरल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचं सांगितलं जातयं. त्यामुळे लाखो लोकांचे मोबाईल नॉट रिचेबल झाले होते.
 
रात्रीपासून मोबाईल नेटवर्क गेल्याने व्हीआयच्या ग्राहकांनाही मोठं नुकसान झालंय. पुण्यातील कल्यानीनगरमधील मुख्य सर्व्हर बंद झाल्याने महाराष्ट्रासह गोव्यातील लाखो मोबाईल बंद आहेत. लवकरात लवकर मोबाईल यंत्रणा सुरू होईल, असं व्हीआयकडून सांगण्यात आलंय.
 
तत्पूर्वी राज्यातील काही भागात बुधवार (14 ऑक्टोबर) रात्रीपासून VI चे नेटवर्क गायब झाले होते. त्यामुळे पुणे आणि आसपास भागात VI च्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबईतदेखील काही ठिकाणी VI चे नेटवर्क डाऊन झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांनी सोशल मीडियावर कंपनीबाबत पोलखोल केली. नेटवर्क नसल्याने ग्राहकांना कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी देखील संपर्क करणे अवघड बनले आहे. काहींनी ट्विटरवर VI च्या नेटवर्कबाबत तीव्र नाराज व्यक्त केली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments