Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लाल मिरचिचे दर गगनाला भिडले

Webdunia
गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (16:29 IST)
लाल मिरच्यांच्या दरांमध्ये जबर वाढ व्हायला लागली आहे. बांगलादेश, फिलिपाईन्स, थायलंड या देशातून अचानक मिरचीला मागणी वाढल्याने प्रतिकिलोचे दर मंगळवारी १४० ते १६० रुपयांवर जाऊन पोहोचले. परिणामी, मिरचीच्या देशांतर्गत दरात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीच्या बाजारात नवीन लाल मिरचीचे दर कमी झाले होते. करोनामुळे चीनमधून गुंटूर मिरचीला मागणी कमी झाली. मात्र, अन्य देशांतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे दर वाढले आहेत. तेजा मिरचीचे दरही कमी झाले होते. मात्र परदेशातील मागणीमुळे तेजा मिरचीच्या दरात टप्याटप्याने वाढ झाल्याची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) पदाधिकारी आणि मिरचीचे मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले.
 
आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीच्या बाजारात नवीन लाल मिरचीचे दर कमी झाले होते. करोनामुळे चीनमधून गुंटूर मिरचीला मागणी कमी झाली. मात्र, अन्य देशांतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे दर वाढले आहेत. तेजा मिरचीचे दरही कमी झाले होते. मात्र परदेशातील मागणीमुळे तेजा मिरचीच्या दरात टप्याटप्याने वाढ झाल्याची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) पदाधिकारी आणि मिरचीचे मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले. गेल्या हंगामात फेब्रुवारी महिन्यात तेजा मिरचीची विक्री घाऊक बाजारात प्रतिकिलो ८५ ते ८८ रुपये या दराने केली जात होती. यंदा या मिरचीचे दर १२० ते १३० रुपयांपर्यंत आहेत. सीड व्हरायटी लाल मिरचीची खरेदी मसाला उत्पादक करतात. पूर्वी लाल मिरचीचे दर वाढण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागायचा. यंदा मात्र मिरची बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे निरीक्षण संचेती यांनी नोंदविले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments