Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यात खतांचा तुटवडा निर्माण होईल!

Webdunia
शुक्रवार, 18 मार्च 2022 (09:08 IST)
रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले आहे.
 
कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सध्याच्या घडीला रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांच्या प्रक्रियेसाठी लागणारे रॉ मटेरियल, केमिकल्स चा आयात बंद झाली आहे. परिणामी खतांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते.
 
खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा तुटवडा होऊ नये, म्हणून आत्ताच्या घडीला हा ऑफ सिझन आहे, रासायनिक खतांच्या संदर्भातील प्रक्रिया अशी आहे की केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याला तर सालाबादाप्रमाणे आवंटन दिले जाते. या राज्याला या महिन्यामध्ये किती खतांचा पुरवठा त्या ठिकाणी करायचा? याचा एक आराखडा देशाचा केला जातो आणि त्याप्रमाणे त्या त्या राज्याला त्या त्या महिन्यामध्ये खतांचे वितरण केले जाते.
 
गेल्या काही दोन तीन महिन्या पासून त्याच्यात काही प्रमाणात होत असेल तर मिळाले त्याच्यामध्ये आपण नियोजन करून भागविण्याचा प्रयत्न केला. त्या कंपनीतुन खत वितरित झाल्याच्या नंतर राज्याला आल्याच्या नंतर , त्या जिल्ह्याला मिळाला, त्या डीलरला, त्या दुकानात गेल्यानंतर, ते शेतकऱ्यांना विक्री झाल्यानंतर याचे पूर्ण ट्रॅकिंग सिस्टम आहे कोणत्या शेतकऱ्याला करावे लागते.
 
त्यानुसार किती खताचा साठा उपलब्ध आहे, याची माहिती मिळते. साधारणतः काही स्थानिक पातळीवर रिटेल ची दुकाने असतात, येथून शेतकऱ्यांना खत पुरवठा केला जातो. यावेळी दुकानदार खताची पावती वैगरे करतो, मात्र खतावणी करत नाही, ती खतावणी केली नाही तर शिल्लक दिसते, मग केंद्र सरकारने असे वाटते की, राज्यात अद्याल खत उपलब्ध आहे, आणि म्हणून द्यायची काही आवश्यकता नाही.
 
त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, जी खत विक्री कराल, त्याची खतावणी करा, अशा सूचना दुकानदार, डीलर, कंपन्यांना केली असल्याचे भुसे यांनी सांगितले.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments