Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SBI ATM मधून पैसे काढण्याचे नियम 18 सप्टेंबर पासून बदलतील

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (14:28 IST)
कोरोना काळात फसवणुकीचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) चे ठोस नियम असूनही फसवणूक केली जात आहे. हे लक्षात घेत भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. एसबीआयने सुरक्षित बँकिंग उपलब्ध करून देण्यासाठी नवीन एटीएम सर्व्हिस सुरू केली आहे. 
 
एसबीआयने वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित एटीएम कॅश विड्रॉल सुविधेला 24 तास अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. 18 सप्टेंबर पासून हा नियमाची  देशभरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. वर्तमान काळात ही सुविधा रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
 
बँकेत ग्राहकांकडून देण्यात आलेल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल, ज्याद्वारे पैसे काढता येतील. अर्थात 18 सप्टेंबर पासून एसबीआयच्या एटीएमहून 10,000 रुपये किंवा याहून अधिक राशी काढल्यास दिवसाला देखील ओटीपीची गरज पडेल.
 
1 जानेवारी 2020 पासून एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य केलं होतं. एसबीआयने म्हटले आहे की ग्राहकांनी बँकेत आपला मोबाइल नंबर अपडेट करावा. 
 
या प्रकारे काढता येतील पैसे
प्रक्रियेप्रमाणे आपण पैसे काढत असाल तेव्हा एटीएम स्क्रीनवर रकमेसह ओटीपी स्क्रीन देखील दिसून येईल. ग्राहकांना ओटीपी त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवण्यात येईल. याने फसवणुकीची शक्यता कमी होईल. हे लक्षात ठेवा की ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची सुविधा केवळ एसबीआय एटीएमवर उपलब्ध आहे. इतर बँकांच्या एटीएममध्ये ही कार्यक्षमता नॅशनल फाइनेंशियल स्विच (NFS) मध्ये विकसित केलेली नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments