suvichar

एसबीआयकडून पेनल्टीमध्ये कपात

Webdunia
मंगळवार, 13 मार्च 2018 (15:13 IST)

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.  बॅंकेकडून या चार्जमध्ये ७५ टक्के कपात करण्यात आली आहे. नवीन दर १ एप्रिल २०१८ पासून लागू होतील. या नव्या नियमानुसार कोणत्याही खातेदाराला १५ रूपयांपेक्षा जास्त दंड द्यावा लागणार नाही. ही रक्कम आत्तापर्यंत ५० रूपये इतकी होती. 

मेट्रो आणि शहरी परीसरात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास चार्ज ५० रूपयांवरून १५ रूपये केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज ४० रुपयांहून १२ रूपये करण्यात आलाय. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज ४० रूपये नाही तर १० रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल.  बॅंकेच्या या निर्णयामुळे २५ कोटी खातेदारांना फायदा होणार आहे. सध्या एसबीआयमध्ये जवळपास ४१ कोटी बचत खाती आहेत. त्यातील १ कोटी खाती पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग कॅम्पस वर बुलडोझर चालला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी २०२७ च्या जनगणनेत जात जनगणनेचा समावेश करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला

हरिद्वार वनक्षेत्रात पाय कापलेले वाघ आणि वाघिणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली

India-Italy Partnership पंतप्रधान मोदी-मेलोनी यांची भेट आणि भारत-इटली विशेष सामरिक भागीदारी, झालेल्या करारांविषयी जाणून घ्या

पंतप्रधान मोदींकडून मेलोनीना स्पेशल गिफ्ट

पुढील लेख
Show comments