Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु

Webdunia
फोन कॉल्स, SMS च्या माध्यमातून अनेकदा नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. हे लक्षात घेऊनच केंद्रीय बँकांकडून बँकेच्या ग्राहकांना सावध करण्यासाठी 'सुनो आरबीआय क्या कहता है' नावाची मोहीम सुरु करण्यात येणार आहे.
 
या मोहीमेअंतर्गत ऑनलाईन सुरक्षीत व्यवहार करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारा दरम्यान होणाऱ्या फसवणुकीसाठी वाचण्यासाठी माहिती दिली जाणार आहे. यासाठी आरबीआयकडून ग्राहकांना मोबाईलवर SMS पाठवले जात आहेत.
 
ग्राहकांना सावध करण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यासोबतच एक नंबरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या नंबरवर तुम्ही मिस्ड कॉल दिल्यास तुम्हाला बँकांचे नियम आणि सुविधांच्या संदर्भात माहिती या माध्यमातून देण्यात येईल. आरबीआयची अशा पद्धतीने जनजागृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयकडून एसएमएस पाठवण्यात येतील. तुम्हालाही आरबीआयचा एसएमएस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुम्हाला यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ८६९१९६०००० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments