Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपा अपयशी आहे, दुष्काळ जाहीर करा - सुप्रिया सुळे

Webdunia
गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:13 IST)
पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीबाबत सरकार अतिशय असंवेदनशीलपणा दाखवत असल्याचे सुप्रिया सुळे  म्हणाल्या आहेत.  रुपयाचा दर इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव व सुशिक्षित बेरोजगार हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. यातून राज्याचे व देशाचे नुकसान होत आहे. आपण नोटबंदी करुन कोणता काळा पैसा बाहेर काढलात. नोटा छापण्यासाठी लागलेला पैसा जर एसटी प्रशासनाच्या वापरात आणला असता तर चांगले झाले असते, असेही खा. सुळे म्हणाल्या. एरंडोल तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.पदासाठी कोणीही लिंगभेद करु नये. जे कर्तव्यदक्ष आहेत व संवेदनशील आहेत त्यांना पद बहाल करू, असे त्यांनी सांगितले. मी टू हे जनआंदोलन होत आहे. हा विषय गंभीर आहे याची संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे आहे. सरकारने याची हाताळणी व्यवस्थित करावी, अशी मागणी त्यांनी केली.जळगाव भेटीला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनाच बैठकीतून बाहेर काढणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. हा त्या लोकप्रतिनिधी व त्या मतदारसंघाचा अपमान आहे. मुख्यमंत्री जो कोणी होईल त्याला संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असणे गरजेचे आहे. पण या सरकारला सत्तेची मस्ती आहे. त्यांच्याच पक्षाचा आमदार मुली उचलण्याची भाषा करतो व त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, या बाबत त्यांनी संताप व्यक्त केला.आज ५० तालुक्यांमध्ये पाऊस झालेला नाही तरी हे सरकार दुष्काळ जाहीर करण्यास तयार नाही. पाणी कमी झाले आहे म्हणजेच दुष्काळ नाही असे मुख्यमंत्री सांगतात. एवढे असंवेदनशील हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments