Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाटा टेलिसर्व्हिसेसला लागणार टाळे?

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:03 IST)
दूरसंचार संस्थेतील वाढती स्पर्धा पाहता ‘टाटा’ला यामध्ये टिकून राहणं कठीण होत आहे. त्यामुळे १४९ वर्षाच्या इतिहासात प्रथमच टाटा टेलिसर्व्हिसेस बंद करण्याचा निर्णय कंपनी घेण्याच्या तयारीत आहे.
टाटा टेलिसर्व्हिससोबत ‘डोकोमो’ या जपानी कंपनीची २६ % भागीदारी आहे. दिवसेंदिवस अनेक टेलिकॉम कंपन्या दूर संचार क्षेत्रात उतरल्या आहेत. यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. सतत होणारे नुकसान पाहता स्वबळावर टिकून राहणं टाटाला यापुढे कठीण होत आहे.
टाटाकडे सुमारे ३४००० कोटीचे कर्ज आहे. टाटाने  टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम फेडणं शक्य होणार आहे. त्यामुळे टाटा अशाप्रकारचा विचार करू शकते. पण अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती टाटाकडून दिली जात आहे. मोबाईल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसने भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली होती, मात्र यामध्ये त्यांना यश आले नसल्याने कंपनीसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments