Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प : फडणवीस

Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (16:31 IST)
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि पंतप्रधान मोदींची अभिनंदन करतो. विकासाला चालना देणारा असा अर्थसंकल्प आज त्यांनी माडंला आहे. हा अर्थसंकल्प विशेषता येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा आहे. एकीकडे कृषी क्षेत्रासाठी प्रचंड मोठ्याप्रमाणात तरतूदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आज जी काही आव्हानं आहेत, ज्या काही अडचणी आहेत. त्या सर्व विचारात घेऊन जो १६ कलमी कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. तो उत्पादकता वाढवण्यापासून ते मला वाहतूक, निर्यात, बाजारपेठांशी जोडणी करणे या प्रत्येक बाबीतील ज्या काही कमतरता आहेत, त्या भरून काढणारा असा हा कार्यक्रम आहे. यासाठी मोठ्याप्रमाणावर तरतूद देखील मोठ्याप्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे.
 
आपल्याला जर आपला विकासदर कायम ठेवायचा असेल व रोजगार निर्मिती करायची असेल तर मोठ्याप्रमाणावर त्यासाठी पायाभूत सुविधांवर गुंतवणूक ही महत्वाची आहे. देशभरातील ६ हजार ५०० प्रकल्प शोधून तब्बल १०३ लाख कोटी म्हणजे जवळजवळ २० लाख कोटी दरवर्षींची गुतंवणुकीची जी काही योजना बनवण्यात आलेली आहे. यामधुन पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप मोठ्याप्रमाणात विकास होणार आहे. मग, यामध्ये १०० विमानतळं असतील, प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा, देशभरातील रस्ते व महामार्गांची कामं, रेल्वेचे विविध प्रकल्प आदी सर्व प्रकारचे प्रकल्प तयार होत आहे. कृषी व पाटबंधारे विभागातील पायाभूत सुविधा आदींचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

पुढील लेख
Show comments