Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या बँकांचे नियम 1 फेब्रुवारी पासून बदलणार आहेत, जाणून घ्या

Webdunia
रविवार, 30 जानेवारी 2022 (14:12 IST)
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांच्या ग्राहकांसाठी बँकेशी संबंधित आवश्यक नियम बदलतील. बँक खातेधारकांसाठी 1 फेब्रुवारी 2022 पासून बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. याबाबत बँकेने खातेदारांना वेळोवेळी माहिती दिली आहे. खातेदारांनी महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) या सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी फेब्रुवारी 2022 पासून नियम बदलतील.
 
चेक क्लिअरन्स नियम बदलेलणार - बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलतील. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी आता ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टमचा नियम पाळावा लागणार आहे. धनादेश दिल्यानंतर खातेदारांना धनादेशाशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागेल. बँकेकडून धनादेशाची पुष्टी करणे अनिवार्य असेल. कोणतीही पुष्टी नसल्यास, धनादेश देखील परत केला जाऊ शकतो.
 
1 फेब्रुवारीपासून SBI खातेधारकांसाठी नियम बदलतील 1 फेब्रुवारीपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. SBI ग्राहकांना 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करणे कठीण होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून SBI ग्राहकांना IMPS व्यवहारांवर अधिक शुल्क आकारले जाईल. आपण बँकेत जाऊन IMPS द्वारे निधी हस्तांतरित केल्यास, आपल्या कडून 2 लाख ते 5 लाख रुपयांसाठी 20 रुपये अधिक GST आकारला जाईल. नवीन नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहे.
 
पंजाब नॅशनल बँकेने पुढील महिन्यापासून डेबिट खात्याशी संबंधित नियम बदलले आहेत. पुढील महिन्यापासून नियमात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. PNB नुसार, 1 फेब्रुवारीपासून हप्ता किंवा गुंतवणूकीच्या डेबिट खात्यात पैसे नसल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यास, आपल्याला 250 रुपये द्यावे लागतील. सध्या यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता ती वाढवून 250 रुपये करण्यात आले आहे. तर, डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यावर 150 रुपये भरावे लागतील.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments