Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नवे कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही

drive
Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (11:40 IST)
राज्य मोठ्या आर्थिक संकटातही आहे. तरी शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी नवे कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला केली. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. 
 
ते म्हणाले, अनेक भागातील पिके पाण्यात आहेत. काही भागात तर जमिनीच खरवडून गेल्या आहेत. विहिरी, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या स्थितीत केंद्राचीही मदत लागेल. एकट्या राज्याला हे पेलणारे नाही. यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत.
 
पिकविम्याच्या निकषात, धोरणात अशा आपत्कालीन स्थितीसाठी शिथिलता हवी, हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. केंद्राने पारित केलेल्या कृषी विधेयकावरही टिप्पणी करीत त्यातील धोका सांगितला. शेतमाल खरेदीत मोठ्या जागतिक कंपन्या उतरतील, आता चांगला भाव देतीलही. पण एकदा येथील व्यापारी झोपवले की मग ते म्हणतील त्या दराने माल द्यावा लागेल. यात एकाधिकारशाही सुरू होईल. म्हणून यास विरोध असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

उल्हासनगरमध्ये भिंत कोसळल्याने मजुराचा मृत्यू

रुग्णांच्या खिशावरचा भार वाढणार, या आजारांसाठी औषधे महाग होऊ शकतात

छत्रपती संभाजी नगरमध्ये दत्तक मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली जोडप्याला अटक

LIVE: शुक्रवारच्या नमाजपूर्वी संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला

संजय निरुपम यांनी रमजानमध्ये सलमान खानने राम मंदिर असलेले घड्याळ घालण्यावर उघडपणे भाष्य केले

पुढील लेख
Show comments