Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटोचे भाव 140 रुपयांवर पोहोचले, अतिवृष्टीमुळे भाव वाढले

Webdunia
मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (09:31 IST)
टोमॅटोचे किरकोळ भाव 140 रुपये किलोवर पोहोचले आहेत. मुसळधार पावसामुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे दक्षिण भारतातील काही भागात टोमॅटोच्या दरात इतकी मोठी वाढ झाली आहे. असे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून देशातील बहुतांश किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव चढेच आहेत. मात्र, दक्षिणेकडील राज्यांमध्ये संततधार पावसामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 
 
इतर विभागांमध्ये टोमॅटोच्या किमतीत काही प्रमाणात घट आहे.उत्तर प्रदेशात (उत्तर राज्ये) टोमॅटोचे किरकोळ भाव सोमवारी 30 ते 83 रुपये प्रति किलोच्या श्रेणीत राहिले. त्याच वेळी, टोमॅटोचा किरकोळ दर सोमवारी पश्चिम विभागात 30 ते 85 रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान राहिला. तर पूर्वेकडील भागात टोमॅटोचे दर 39 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिले आहेत. असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी मॉडेल किंमत 60 रुपये प्रति किलो आहे.
 
दक्षिण भारतात टोमॅटोचे भाव वाढतच आहे 
 मायाबंदरमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव 140 रुपये प्रतिकिलो आहेत. त्याचवेळी पोर्ट ब्लेअरमध्ये सोमवारी टोमॅटोचा भाव 127 रुपये किलो होता. केरळमध्ये सोमवारी टोमॅटोचा भाव तिरुअनंतपुरममध्ये १२५ रुपये प्रति किलो, पलक्कड आणि वायनाडमध्ये १०५ रुपये प्रति किलो, त्रिशूरमध्ये ९४ रुपये, कोझिकोडमध्ये ९१ रुपये आणि कोट्टायममध्ये ८३ रुपये प्रति किलो होता.
 
कर्नाटकातील मंगळुरू आणि तुमकूर या मेट्रो शहरांमध्ये टोमॅटोची स्थिती सोमवारी टोमॅटोचे दर 100 रुपये किलोच्या पातळीवर राहिले. टोमॅटोचा भाव धारवाडमध्ये ७५ रुपये किलो आणि म्हैसूरमध्ये ७४ रुपये किलो होता. तर शिमोगा आणि बेंगळुरूमध्ये टोमॅटोचे भाव अनुक्रमे ६७ रुपये आणि ५७ रुपये किलो आहेत. सोमवारी टोमॅटोचा भाव तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये 102 रुपये प्रति किलो आणि चेन्नईमध्ये 83 रुपये प्रति किलो होता. मेट्रो शहरांबद्दल बोलायचे झाले तर टोमॅटोचा भाव मुंबईत ५५ रुपये, दिल्लीत ५६ रुपये, कोलकात्यात ७८ रुपये आणि चेन्नईत ८३ रुपये किलो होता. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments