Festival Posters

'अग्निहोत्र 2’ प्रेक्षकांचा निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली

Webdunia
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (10:28 IST)
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका  लवकरच निरोप घेत आहे. दहा वर्षांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.  त्याच पार्श्वभूमीवर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र 2’ मालिका 2 डिसेंबर 2019 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, प्रेक्षकांचा या नव्या पर्वाला प्रतिसाद न मिळाल्याने टीआरपीमध्ये ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा नर्णय घेतला.
 
‘अग्निहोत्र 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. विशेष म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत या मालिकेमार्फत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. .
 
‘अग्निहोत्र 2’ मालिकेचा शेवटचा भाग येत्या 9 मार्चला प्रसारित होणार आहे. त्यानंतर ‘वैजू नंबर 1’ ही मालिका सुरु होणार आहे. मालिका सुरु झाल्यानंतर दोन महिन्यातच ही मालिका बंद होत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपटाने इतिहास रचत १००० कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला

गर्दीपासून दूर कुठेतरी जायचंय? कोकणातील 'ही' समुद्रकिनारे अजूनही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे

अजित पवार यांच्या निधनाने भावूक झालेले अभिनेते गजेंद्र चौहान म्हणाले-'दादा' यांचे निधन हे खूप मोठे नुकसान आहे

Ajit Pawar's Death चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

पार्श्वगायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनाला निरोप दिला

पुढील लेख
Show comments