rashifal-2026

‘अग्निपंख’ सिनेमाचा टीजर

Webdunia
‘अग्निपंख’या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच फेसबुकवर प्रदर्शित झाला. हॉलीवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फायर ब्रिगेडवर आधारीत बीग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा ‘अग्निपंख’हा ड्रीमप्रोजेक्ट आहे.
 
महाकाय अग्नितांडव असो...भूकंप असो वा महाप्रलय, मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकुल परीस्थितीत करत असते. उन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नि आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अगिनिशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
 
“अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय ॲक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग हि या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘अग्निपंख’ मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे.” असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला.
 
“अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्स मुळे चित्रपटाचं बजेट मोठं असलं तरी कसलीही कसर बाकी न ठेवता दृश्यानुभव उच्च प्रतीचा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.” असे मत निर्माते रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.
 
या चित्रपटातील कलाकार कोण?  या प्रश्नाचे उत्तर अजुनही गुलदस्त्यात आहे. ‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

पुढील लेख
Show comments