suvichar

‘अग्निपंख’ची टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Webdunia
‘अग्निपंख’ या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय ॲक्शनपटाच्या टीमने मुहूर्तापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड यांनी अग्निपंखच्या बहुचर्चित पहिल्या टीझर पोस्टरची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी चित्रपटाचा घटनापट मुख्यमंत्र्यांसमोर उलगडला तसेच दिग्दर्शक गणेश कदम यांनी या चित्रपटाच्या भव्यतेविषयी तसेच चित्रीकरणातील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती दिली.
 
आजवर सैन्यदल तसेच पोलीस दलावर आधारित अनेक सिनेमे आले परंतु माध्यमांमध्ये आणि जनमानसात तुलनेने दुर्लक्षित राहिले आहे. कशाचिही पर्वा न करता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवची बाजी लावून मोहिम फत्ते करणाऱ्या अग्निशमन दलाची शौर्यगाथा इतक्या भव्य प्रमाणात भारतात प्रथमच आणि तेही मराठीत येत असल्याचे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निपंखच्या टीमचे कौतुक केले व आपल्यालाही अभिमान वाटल्याचे सांगितले. या अभिमानास्पद चित्रपटाचा एकूण आवाका लक्षात घेता, आवश्यक असलेल्या बाबींसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड, अभिजीत गायकवाड, दिग्दर्शक गणेश कदम, पटकथा-संवाद लेखक सचिन दरेकर आणि जनसंपर्क अधिकारी मयूर आडकर उपस्थित होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कौतुकाने पाठ थोपटल्याने अग्निपंखच्या टीमचा उत्साह आणखी वाढला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

द इंडिया स्टोरी’ २४ जुलैला प्रदर्शित; काजल अग्रवाल–श्रेयस तळपदेची नवी जोडी चर्चेत

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे रितेश देशमुख नाराज, बागेश्वर बाबांनी माफी मागितली

विनोद खन्ना यांची खलनायकापासून सुपरस्टार बनण्यापर्यंतची संघर्षाची आणि यशाची कहाणी

पुढील लेख
Show comments