suvichar

'मुळशी पॅटर्न'नंतर आता 'रेती पॅटर्न'

Webdunia
सोमवार, 17 डिसेंबर 2018 (13:22 IST)
सध्या राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटावर सुरुवातीला बरीच टिकाटिप्पणी झाली पण जेव्हा चित्रपटगृहांत तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारित सहकुटुंब पाहता येईल असा चित्रपट प्रवीण तरडेंनी प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. हा चित्रपट, त्याचे कथानक, संवाद यांसोबतच आणखीएका गोष्टीने लोकांची मनं जिंकली आहे ती म्हणजे प्रवीण तरडे यांची बेधडक वक्तव्यं आणि मतं. शेतकर्‍यांवर होणारा अन्याय, विकासांचे पर्याय शोधताना शेतकर्‍यांचा न केलेला विचार, तहसीलदारांवर होणारे हल्ले यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात आपल्या चित्रपटांतून सामाजिक मद्यांना अधोरेखित करणार असल्याचं सांगतानाच 'मुळशी पॅटर्न'नंतर आता  'रेती पॅटर्न' घेऊन येणार असं प्रवीण तरडे म्हणाले. देशाचा विकास करताना आपण शेतकर्‍यांचा विचारच करत नाही ही आपली खरी समस्या आहे. माझा चित्रपट हा शेतकर्‍यांना सजग करेल. शेती ही विकण्यासाठी नव्हे तर राखण्यासाठी असते असे संवाद यामध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टी अडकणार लग्नबंधनात

धुरंधर २: द रिव्हेंजच्या कलाकारांचे मानधन समोर आले, रणवीर सिंगने सर्वाधिक रक्कम घेतली

MANN-PISHACH केवळ ३३ हजार रुपये आणि दोन कलाकारांच्या मदतीने ८० मिनिटांचा चित्रपट कसा बनला?

मराठी चित्रपट “अभया”चा पहिला पोस्टर प्रदर्शित !ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडची दमदार प्रस्तुति !

अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले

सर्व पहा

नवीन

गुढी पाडवा २०२६: बॉलिवूड अभिनेत्रींकडून पैठणी साडी स्टाईलची प्रेरणा घ्या

कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?

'धुरंधर: द रिव्हेंज'च्या प्रदर्शनापूर्वी आदित्य धरचा मोठा खुलासा: एंड क्रेडिट्समध्ये एक आश्चर्य दडलेले आहे 'धुरंधर ३' बनणार का?

सारा अली खानला केदारनाथमध्ये NO ENTRY

Mast Joke: मार्च Ending मुळे नाही जमलं

पुढील लेख
Show comments