ढोल आणि ताशेव्यतिरिक्त एका गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यातही धमाल केली ते हेच गाणं शांताबाई.... शांताबाई... या गाण्याने अनेकांना वेड लावलं. हल्लीच्या युवांना डांस करण्यासाठी हे गाणं तर हवचं हवं. याच्या बीट्स आणि लिरिक्सने लोकांना वेड लावले. लोकसंगीताच बाज आणि मराठी रॅपचा स्वरूप असलेल्या या गाण्याने धुमाकूळ घातला.
या गाण्यामुळे संजय लोंढे रातोरात स्टार बनले. परंतू कोणालाही कल्पना नसेल हे गाणं वीस वर्षापूर्वी 8X10 च्या खोलीत रचलेले आहे. संजय लोंढे पुण्याच्या नानापेठ राजेवाडीत भाड्याच्या झोपडीत राहत होते. हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल याची कल्पनाही नसलेले लोंढे यांनी सांगितले की ते त्यांच्या मुलगी प्राजक्तासाठी हे गाणं गुणगुणत असतं. त्यामुळे हे गाणं अस्तित्वात आलं. गणेशोत्सवाच्या तीन महिनेपूर्वी त्यांनी या गाण्याला आवाज दिला आणि ते इतंक गाजलं की कोणीही याची कल्पना केली नव्हती.
या झोपडीत संजयची पत्नी, दोन मुली, मुलगा आणि अपंग आई जिवण्यापण करतात. आपल्या भावाच्या उपचारासाठी त्यांनी हे गाणं एका कॅसेट कंपनीसाठी गायलं. यापूर्वीही संजयने अनेक गाणी लिहिली आहेत. आठवी पास संजय यांना लहानपणापासून गाण्याची आवड असल्यामुळे त्यांनी मराठी रॅप आणि खंडोबाची गाणीही लिहिली आहेत. यापूर्वी त्यांचे गाजलेलं देव धनगर वाड्यात घुसला यावर अनेकांनी ठेके लावले आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या गाण्यांना प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, वैशाली सामंत, सुदेश भोसले या गायकांचाही आवाज लाभला आहे.
इतकी प्रसिद्धी मिळाल्यावरही संजय यांना वाटतं की अपेक्षाकृत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करण्याची गरज आहे आणि त्यांची यासाठी तयारी आहे.