Marathi Biodata Maker

पठडीबाहेरील लिखाण करणे खरे चॅलेंजिंग- शिल्पा नवलकर

Webdunia
टीव्हीवरची मालिका म्हणजे नायिकाप्रधान... या मालिकेत जोपर्यंत नटी रडत नाही तोवर मालिकेचा टीआरपी वाढतच नाही... पण या पठडीत न बसणाऱ्या एका मालिकेचे लिखाण सध्या लेखिका शिल्पा नवलकर करतायत.
स्टार प्रवाहवरच्या ‘गोठ’ मालिकेतील पटकथा कागदावर उतरवताना लेखक म्हणून माझ्यासमोर भले मोठे आव्हान आहे ते म्हणजे टीव्हीवरील आजवरच्या मालिकांच्या परंपरेविरोधात लिहिण्याचे... मालिकांमध्ये सोशिक सून, छळणारी सासू, कारस्थानी बाई सर्रास असते. ही पात्रे जर नसतील तर त्या मालिकेचे दिवस भरलेच म्हणून समजा. पण ‘गोठ’मधील मुख्य स्री पात्र म्हणजे याच्या नेमके उलट आहे. यातील मुख्य पात्र आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडते. कुणी जर आपल्याशी चुकीचे वागत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणारी स्री ‘गोठ’मध्ये दिसते. त्यामुळे ‘गोठ’चे लिखाण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, असे मालिकेच्या लेखिका शिल्पा नवलकर सांगतात.

नाटके लिहिणे, चित्रपटाच्या कथेचे लिखाण हे खूप सोपे म्हणावे लागेल. पण टीव्हीवरचे लिखाण, तेही मालिकेचे... त्या लेखकांचा कस लागलाच म्हणून समजा. कादंबरी, कथा लिहिली तरी त्याला एक विशिष्ट वाचकवर्ग असतो, पण टीव्ही मालिकांचे तसे नाही. तेथे तुम्हाला छोट्या मुलापासून कॉलेज तरुण-तरुणी, नोकरदार , स्री-पुरुष, हाऊसवाईफ ते थेट घरातल्या आजी-आजोबांना पटतील असे विचार, पात्र त्या मालिकेत उभी करायची असतात. शिवाय टीव्ही मालिकांना एपिसोडची डेडलाईन असल्याने तुम्हाला एक एपिसोड वेळीच लिहून द्यावा लागतो, असेही त्या म्हणतात.

सध्याच्या टीव्हीवरच्या ट्रेण्डविषयी बोलताना नवलकर म्हणतात की, आजही हिंदी चॅनेलवर टिपिकल सास-बहूच्या सीरियल्स सुरू आहेत, पण मराठीत वैविध्यपूर्ण मालिका येत आहेत. हे मराठीचे वेगळेपण म्हणावे लागेल. चित्रपटगृहांत किंवा नाटक पाहायला येणारा प्रेक्षक हा पैसे देऊन येत असतो. टीव्ही मालिकांचे तसे नसते. आपण आपली मालिका प्रेक्षकांच्या घरी घेऊन जातो. त्यामुळे सर्वांना आवडेल असे लिखाण करणे ही लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

जोधपूरमधील एक प्रसिद्ध ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळ Mandore Garden

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सहा वर्षांनंतर रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, न्यायालयाने बँक खाती तात्काळ फ्री करण्याचे आदेश दिले

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

पुढील लेख
Show comments