Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीम इंडियाचा बांगलादेशवर सात गडी राखून विजय

Webdunia
सोमवार, 16 जून 2014 (10:49 IST)
रॉबिन उथप्पा (50) आणि अजिंक्य रहाणे (64) या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या बळावर टीम इंडियाने  यजमान बांगलादेशला सात गडी राखून विजय मिळवला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने   1-0 ची आघाडी घेतली आहे.

बांगलादेशने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 272 धावा केल्या होत्या. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देत 16.4  षटकांत एक गडी गमावून 100 धावा काढल्या. मात्र, अचानक पावसाचे आगमन झाले आणि खेळ थांबवण्यात आला.  त्यानंतर भारताला डकवर्थ लुइसच्या नियमानुसार 26 षटकांत 150 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताने 24.5  षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा काढून विजय पटकावला.

तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहीम (59), शाकीब (52), महमुदुल्ला (41) यांनी केलेल्या  चमकदार खेळीने बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

उथप्पाने 44 चेंडूंत 3 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 50 धावा काढल्या. रहाणेने 70 चेंडूंत 5 चौकार व 2  षटकारांच्या मदतीने 64 धावा ठोकल्या. अंबाती रायडू (16) आणि कर्णधार सुरेश रैना (15) नाबाद ठरले.  रॉबिन उथप्पा याने तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. 

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

Show comments