Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीलंकेचा विजय अर्थात भारताचा फायनलमध्ये प्रवेश!

वेबदुनिया
मंगळवार, 20 मार्च 2012 (11:58 IST)
WD
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना आज होणार आहे. भारताच्या दृष्टीने ही लढत श्रीलंकेने जिंकण्याची गरज आहे.

भारताने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून आशा कायम राखल्या आहेत; पण तेवढे अंतिम फेरीसाठी पुरेसे ठरलेले नाही. आता श्रीलंकेचीही कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरू शकते. बांगलादेशकडून हरल्यामुळे भारताच्या मोहिमेला सुरवातीलाच धक्का बसला. स्पर्धेच्या नियमानुसार दोन्ही संघांचे गुण समान झाल्यास एकमेकांविरुद्धच्या सामन्यातील निकालाचा निकष लावला जाईल. या बाबतीत बांगलादेश सरस आहे.

फॉर्मचा निकष लावल्यास बांगलादेश आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवू शकतो. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला कडवी झुंज दिल्यानंतर बांगलादेशने भारताच्या 289 धावांचा यशस्वी पाठलाग केला. "टायगर्स' असे बांगलादेशच्या संघाचे टोपणनाव आहे. मायदेशात दणाणून प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांच्या साक्षीने बांगलादेशने धडाकेबाज कामगिरी केली आहे.

काहीही झाले तरी बांगलादेशसाठी ही लढत सोपी नसेल. श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचा संघ सहजी हार मानणार नाही. दोन सामने गमावल्यानंतर एक सामना जिंकून मायदेशी परतण्यापूर्वी थोडी प्रतिष्ठा राखण्याचा त्यांचा निर्धार असेल.

आजचा सामना
श्रीलंका वि. बांगलादेश
थेट प्रक्षेपण ः दुपारी 1.30
निओ क्रिकेट

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

Show comments