Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:01 IST)
रविवारी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने पाकिस्तानवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र यानंतर बांगलादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये वाद झाला. 
 
आयसीसीने या प्रकरणात व्हिडीओ फुटेज तपासत वाद घालणाऱ्या 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. ICC कडून तीन बांगलादेशी खेळाडूंसह दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
 
बांगलादेशकडून तौहीद हृदॉय, शमिम हुसैन आणि रकीब उल-हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई केली गेली आहे. या पाचही खेळाडूंवर आयसीसीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी 4 ते 10 सामन्यांची बंदी घालण्यात आलेली आहे. 
 
सामना रंगतदार झाला असला तरी खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणं, प्रतिस्पर्ध्यांचं अभिनंदन करणं हे महत्वाचं असतं. मात्र अंतिम सामन्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे सर्व नियमांचा भंग झाला. यामुळे ICC कडून कारवाई करण्यात आली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

PBKS vs KKR : पंजाबने कोलकाता विरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग करून इतिहास रचला

PBKS vs KKR : पंजाब किंग्जने T20 इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत 8 गडी राखून सामना जिंकला

KKR vs PBKS Playing 11 : आज पंजाब आणि कोलकाता आमनेसामने होतील,प्लेइंग 11जाणून घ्या

T20 WC 2024 : युवराज सिंगला दिली २०२४ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी मोठी जबाबदारी

SRH vs RCB: कोहलीने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला

पुढील लेख
Show comments