Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BCCI महिला टी20 क्रिकेट स्पर्धा: नाशिकच्यामाया सोनवणेची प्रभावी गोलंदाजी; आंध्र पाठोपाठ केरळ विरुद्ध ही 4 बळी

BCCI महिला टी20 क्रिकेट स्पर्धा: नाशिकच्यामाया सोनवणेची प्रभावी गोलंदाजी  आंध्र पाठोपाठ केरळ विरुद्ध ही 4 बळी
Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (21:55 IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणे ने पुदुचेरी येथे आंध्र पाठोपाठ केरळ विरुद्ध ही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकी ने सामना गाजवला. आज दुसर्‍या सामन्यात केरळ विरुद्ध माया ने चार षटकात केवळ 12 धावा देत 4 बळी घेतले. यात 12 निर्धाव चेडुंचा समावेश होता.
 
सर्वाधिक 30 धावा करणार्‍या केरळची कर्णधार एस सजनाला त्रिफळाचीत करून मायाने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरविला . या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळ ला 90 धावात रोखले. शिवाय 5 बाद 65 या स्थितित, सातव्या क्रमांकावर फलंदाजी ला येऊन नाबाद 5 धावा करताना महाराष्ट्राला 18 व्या षटकात, दोन गडी राखून विजयी करण्यात माया सोनवणे ने मोलाचा हातभार लावला.
 
याआधी पहिल्या सामन्यात देखील काल आंध्र विरुद्ध अतिशय प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते . माया ने चार षटकात 32 धावात 4 बळी घेतले. यात 9 निर्धाव चेडुंचा समावेश होता. आंध्र च्या 73 धावांच्या सलामीनंतर माया ने दोन्ही फलंदाजांना त्याच धावसंख्येवर तंबूत पाठविले. त्यामुळे आंध्र ला 136 धावात रोखण्यात महाराष्ट्राला यश आले.
 
पण आंध्र ने महाराष्ट्राला 9 बाद 95 असे रोखल्यामुळे वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला. वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – 21 एप्रिल मेघालय  22 एप्रिल हैद्राबाद व 24 एप्रिल राजस्थान विरुद्ध.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला

22वर्षीय गोलंदाजाने इतिहास रचला,सुवर्ण विक्रम रचला

AFG vs ENG: इंग्लंड स्पर्धेतून बाहेर, अफगाणिस्तानचा पहिला विजय

IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स संघाचा मोठा निर्णय, या अनुभवी खेळाडूकडे सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

माकडेही इतकी केळी खात नाहीत, वसीम अक्रमने पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल केले

पुढील लेख
Show comments