suvichar

धोनीसमोर मोठे आर्थिक संकट ?

Webdunia
सोमवार, 18 जून 2018 (17:23 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या एका अडचणीत सापडला आहे. काही वर्षांपूर्वी धोनीने रांचीमध्ये संपत्ती विकत घेतली होती. धोनीच्या याच संपत्तीचा लिलाव होण्याची शक्यता आहे, असे झाले तर धोनीला फार मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे धोनीसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.
 
काही वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने रांचीमधील डोरंड येथे शिवम प्लाझा नावाच्या इमारतीमध्ये तीन मजले विकत घेतले होते. या इमारतीचे बांधकाम दुर्गा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने केले आहे. हे प्राजेक्ट पूर्ण करण्यासाठी दुर्गा डेव्हलपर्सने हुडकोकडून १२ कोटी ९५ लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु, हे कर्ज चूकवू न शकल्यामुळे दुर्गा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज देणाऱ्या हुडकोने या संपूर्ण इमारतीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. इमारतीच्या नियोजित आराखड्यानुसार, दुर्गा डेव्हलपर्सने १० मजल्यांची इमारत बांधणे अपेक्षित होते. पण काम सुरू असतानाच दुर्गा डेव्हलपर्स आणि जमिनीचे मालक यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हुडकोने कर्जाच्या एकूण रक्कमेपैकी ६ कोटी रूपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम रोखून धरली. यामुळे इमारतीचे फक्त सहाच मजले पूर्ण होऊ शकले. तसेच कर्जाचे बफ्ते थकल्यामुळे हुडकोने दुर्गा डेव्हलपर्सला दिवाळखोर घोषित केले असून त्यांनी आता कर्ज वसुलीसाठी या इमारतीचा लिलाव करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या दुर्गा डेव्हलपर्स आणि हुडको यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये धोनीचे कोट्यावधी रूपये अडकलेले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचांचा मृत्यू तर अनेक खेळाडू जखमी

महिला क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठत हरमनप्रीत कौरने विश्वविक्रम रचला

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणी वाढल्या, इम्रान खान यांना पत्र लिहिल्याबद्दल एफआयआर दाखल

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात एक अनोखी कामगिरी केली

T20 World Cup विश्वचषकात खाते उघडू न शकलेला अभिषेक पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर इशान पहिल्या १० मध्ये सामील

पुढील लेख
Show comments