Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs AUS: भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करून मालिका जिंकली

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (23:12 IST)
IND vs AUS: भारताने चौथ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ सात विकेट्स गमावून केवळ 154 धावा करू शकला आणि सामन्यासह मालिकाही गमावली. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 3 डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. 
 
भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 37 आणि जितेश शर्माने 35 धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड 32 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे बेन डॉलिशने तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला एक विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 31 आणि मॅथ्यू शॉर्टने 22 धावांचे योगदान दिले. बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिडने प्रत्येकी 19 धावांचे योगदान दिले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. अक्षर पटेलने तीन आणि दीपक चहरने दोन गडी बाद केले.

रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी अतिशय संयमी गोलंदाजी केली आणि अक्षर-रवीने मिळून आठ षटकांत 33 धावा देत चार बळी घेतले.
 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार सूर्यकुमारने श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, दीपक चहर आणि मुकेश कुमार यांचा समावेश करून प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले .
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांनी केले जगज्जेत्या टीम इंडियाचे स्वागत

वानखेडेवर टीम इंडियाचा गौरव, BCCI ने दिले 125 कोटी रुपये

T20 World cup: मुंबईच्या खेळाडूंचा महाराष्ट्र विधान भवनात सत्कार, शुक्रवारी होणार कार्यक्रम

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

पुढील लेख
Show comments