Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs ENG 3rd ODI: पंत-हार्दिकच्या उत्कृष्ट खेळीने टीम इंडियाचा शानदार विजय, ODI मालिका 2-1 ने जिंकली

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2022 (11:05 IST)
टीम इंडियाने रविवारी (17 जुलै) इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे. रविवारी (17 जुलै) मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात भारतानेपाच विकेट्स राखून विजय मिळवला. 
 मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 260 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे भारतीय संघाने पाच गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने वनडे मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारतीय संघाच्या विजयात ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या हिरो म्हणून उदयास आले. पंतने 125 धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी पंड्याने अष्टपैलू कामगिरी केली.
 
72 धावांवर चार विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी 133 धावांची भागीदारी केली.हार्दिकने ५५ चेंडूत १० चौकारांसह झटपट ७१ धावा केल्या. ऋषभ पंत 113 चेंडूत 125 धावा करून नाबाद राहिला. पंतने आपल्या खेळीत 16 चौकार आणि दोन षटकार मारले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 45.5 षटकांत 259 धावांत गारद झाला. आणि भारताने शानदार विजय मिळवला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments