Publish Date: Mon, 05 Feb 2024 (15:03 IST)
Updated Date: Mon, 05 Feb 2024 (15:13 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. भारतीय संघाने 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. अश्विन 500 कसोटी बळींपासून अजून एक विकेट दूर आहे.
विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी 28 धावांनी जिंकली. तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.
भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 253 धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली होती. गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला 292 धावांत गुंडाळून सामना जिंकला.
webdunia
Publish Date: Mon, 05 Feb 2024 (15:03 IST)
Updated Date: Mon, 05 Feb 2024 (15:13 IST)