Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋतुराज गायकवाड T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (13:13 IST)
पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात गुवाहाटी येथे खेळला जात आहे, ज्यामध्ये पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. गत सामन्याचे नायक यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन स्वस्तात बाद झाले आणि एकूण 24 धावांपर्यंत भारताचे दोन विकेट पडल्या होत्या.
 
यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवसह रुतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. सूर्या 39 धावा करून बाद झाला. यानंतर, गायकवाडने तुफानी फलंदाजी करत 57 चेंडूत 13 चौकार आणि सात षटकारांसह 123* धावा केल्या. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. 

रुतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय फलन्दाज ठरला. त्याने भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.  T20 फॉर्मेट मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम शुभमन गिलच्या नावावर आहे. त्याने न्यूजीलँडविरुद्ध नाबाद 126 धावांची खेळी खेळली.
 
गायकवाडच्या शतकाच्या जोरावर भारताने 3 गडी गमावून 222 धावा केल्या. गायकवाड यांच्या आक्रमक खेळीबाबत ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया येत आहेत.

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं 'एआय वॉशिंग' म्हणजे काय आहे?

T20 World Cup : या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

Israel Hamas War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील हल्ले वाढले, अमेरिकेचा इशारा

आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार का? पीटी उषाच्या प्रस्तावावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची माहिती

1 जुलै पासून 3 नवीन कायदे होणार लागू, काय परिणाम होतील जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

T20 World Cup : या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळाला

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

रोहितने वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानातून माती उचलून चाखली चव, व्हिडीओने मने जिंकली

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

पुढील लेख
Show comments