Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेफाली वर्माने आशियाई क्रीडा स्पर्धेत खास विक्रम करून इतिहास रचला

Webdunia
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (15:36 IST)
गुरुवार, 21 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघ आणि मलेशिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे हा सामना सुरुवातीला 15-15 षटकांचा ठेवण्यात आला होता मात्र दुसऱ्या डावात पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने भारतीय महिला संघाच्या वतीने आपल्या स्फोटक फलंदाजीने इतिहास रचला. 
 
आशियाई क्रीडा स्पर्धेत अर्धशतक ठोकणारी ही 19 वर्षीय खेळाडू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिने 39 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. शफालीने 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत सामन्यात हा टप्पा गाठला.  याआधीही शेफालीने टीम इंडियासाठी अनेक स्फोटक खेळी खेळल्या. 
 
खराब हवामानामुळे सामना उशिरा सुरू झाला. मलेशियाने सामन्यापूर्वी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 15 षटकांत 2 गडी गमावून 173 धावा केल्या. यादरम्यान कर्णधार स्मृती मंधाना ने 16 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांची शानदार खेळी केली
 
जेमिमाह रॉड्रिग्सने 29 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 47 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने 7 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 21 धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात मलेशियाच्या महिला संघाला केवळ दोन चेंडूच फलंदाजी करता आली, त्यानंतर पुन्हा पावसाने सामना विस्कळीत केला. 
 



Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांनी केले जगज्जेत्या टीम इंडियाचे स्वागत

वानखेडेवर टीम इंडियाचा गौरव, BCCI ने दिले 125 कोटी रुपये

T20 World cup: मुंबईच्या खेळाडूंचा महाराष्ट्र विधान भवनात सत्कार, शुक्रवारी होणार कार्यक्रम

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

पुढील लेख
Show comments