Dharma Sangrah

शिखर, विराटच्या खेळीने भारत विजयी

Webdunia
फिरकीपटूंनी केलेल्या शानदार गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेल्या तुफानी फलंदाजीच्या मदतीने भारताने पहिल्या एकदिवशीय सामन्यात श्रीलंकेवर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. धवनने फक्त 90 चेंडूत 20 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 132 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीनेही 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 70 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. भारताने फक्त 28.3 षटकांत श्रीलंकेने दिलेले 217 धावांचे आव्हान पार केले.
 
रांगिरी आंतरराष्ट्रीय मैदानावर रविवारी झालेल्या 5 एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत श्रीलंकेला 43.2 षटकांत 216 धावांवर रोखले. त्यानंतर 217 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सावध सुरूवात केली. मात्र, भारताची पहिली विकेट 23 धावांवर गमाविली. सलामीवीर रोहित शर्मा 4 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर फॉर्मात असलेल्या शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर आणि विराट यांनी श्रीलंकेला एकही यश मिळू दिले नाही. शिखर धवनने नाबाद 132 आणि विराट कोहली यांनी नाबाद 82 धावांची खेळी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

स्मृती मानधनाचे आयसीसी रँकिंगमध्ये वर्चस्व प्रस्थापित झाले; पुन्हा एकदा नंबर १ फलंदाज बनली

IND vs WI: सॅमसनला नाही तर या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेअर अवॉर्ड मिळाला

भारत अफगाणिस्तानसोबत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार, बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले

ZIM vs SA :दक्षिण आफ्रिकेकडून झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव करत सुपर एट मध्ये प्रवेश

टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले

पुढील लेख
Show comments