नवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसर्या कसोटी सामन्यानंतर काही दिवसांसाठी आपल्या गुडगांव येथील निवास स्थानी विश्रांतीसाठी पोहचला आहे. विशेष म्हणजे जेव्हा दिल्लीत पोहोचला तेव्हा दिल्लीचे वातावरण धुक्याने व्यापले होते.
दिल्ली एनसीआरच्या धुक्याने व्यापलेली सकाळ खूपच लांब कालावधीनंतर विराट पाहत होता त्याने याबाबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की ही पाहट माझ्यासाठी खूप खास आहे. त्याने एक सेल्फीही शेअर केली आहे. ही फीलिंग फार लांब कालावधी नंतरची आणि थंडी व धुक्याने व्यापलेली दिल्ली अशी भावना व्यक्त केली.